Friday, November 30, 2012

विनाकारण तू संबंध तोडते आहेस..
तोडलेस म्हणण्यापेक्षा संपवले आहेस..

आपल्या नात्याला येणारा नैसर्गिक मोहोर मला पहायचा होता. त्यातून उमलणारी बारामाही आणि जन्मोजन्मी दरवळणारी फुलं मला अनुभवायची होती. त्यासाठी हवा तेवढा लागणारा वेळ द्यायचीही तयारी होतीच की माझी... अहं.. आपली.

पण, काहीतरी कुठेतरी चुकतंय खरं.

आता वाटतंय नातं उमलण्यासाठी लागणारा वेळ देऊन चूक केली की काय मी.
कारण, आजतागायत हा वेळ संपत

च नाहीये.. उलट जखडून ठेवतोय हिरव्या पालवीला.
हा ताण असह्य होऊन अस्वस्थ होतंय मन.
आता तर विनाकारण आलेल्या या अपराधी वाळवीने घरटं बांधलंय झाडावर.

दिसलेलं हे पहिलं घरटं मोठं होण्यापूर्वीच पाडलेलं बरं. नाही?
कारण, वाळवीच ती.

आत वाटतं
भले नाही मोहोर आला तरी बेहत्तर.
पण आपलं झाड हिरवं तरी राहील.

नाही?

................................................................. पुस्तकातून.

No comments:

Post a Comment