Friday, March 8, 2013

अपराधी भाव मनात दाटून आला की मनात विमनस्क शांतता येते.
अपरिहार्य शरणांगत भाव असला की खिन्नता मूळ धरू लागते.
स्वैर शरणांगती असेल, तर स्वर्गीय आनंदी शांती...
शांततेचे असे निकष मी नेहमीच लावत आलो आहे.
पण, आज या अनोळखी शांततेचा डोह वेगळा आहे.
इतरवेळी ग्रासलेल्या मौनाच्या तळाचा अंदाज बांधणे माझ्यालेखी शक्य होते.
पण, या कालडोहात उतरणे महाकर्मकठीण.
कारण, भवताली उगवलेली तटस्थता या डोहातून मला वर काढण्यास धजावणार नाही हे निश्चित.
मग, तळ शोधत निघून जाणे हा एकच पर्याय.
पण, तळाच्या अंधाऱ्या गंगेत लागला हाताला चंद्र तर ठीक.
नाहीतर?
नाहीतर काय?




 शब्द बेइमान..
निघून गेले लेकाचे.
....................................................................................... पुस्तकातून..
.