Friday, November 1, 2013

खरे काय?

कसं होतं असं?
आजवर आपण ना कधी बोललो.. ना कधी भेटलो.. वर्षामागून वर्षं उलटली. तरी आपण एकमेकांना शोधण्याचा यत्न केला नाही. एकमेकांचं अस्तित्व जाणवल्यावरही आपण कधी त्याकडे ढुंकून पाहिलं नाही. असं असताना आज अचानक समोरुन असे भडाभडा काय बाहेर येते आहे. जसे की आपण वर्षानुवर्षे भेटतो आहोत.. बोलतो आहोत.
खरं काय?
आजची भावना की कालची शांतता?
बनावट आहे की नव्याने फुटलेला उमाळा?
हा संवाद आहे की फक्त जाता जाता साधलेला संपर्क?
अंगावर आलेली अनोळखी मनांची ही चक्री मला भंडावून सोडते आहे.
बिनउत्तरांचे प्रश्न निर्माण करते आहे.
या गणगोती फुगवट्याआडचं किती उरेल.. किती सरेल..
माहीत नाही.
पण, संपर्क नको. कारण तो सोपा आहे.
उरतो प्रश्न संवादाचा.
ती जर जाता जाता साधण्याची गोष्ट असती,
तर आज दिसणारा.. नात्यांमधला विमनस्क गुंता झालाच नसता.
............................................................ पुस्तकातून.