Saturday, December 1, 2012

"चल निघतो मी. नाही..
आता थांबणं शक्य नाही.
तेव्हा थांबलो होतो म्ह्णून तर आलो तुझ्याकडे. पण, तू तुझं दार केवळ किलकिलं करून माझ्याशी संवाद साधलास. सुरुवातीला ठीक होतं. पण, नंतर... पुरेसा परिचय झाल्यावर तरी तू तुझं दार सताड उघडायचंस माझ्यासाठी.
पण तू केवळ या दरवाजाच्या चौकटीतूनच बोलत राहिलीस.
मला ही चौकट नव्हती असं नाही. पण ती चौकट तोडून मी बाहेर आलो होतो.
इतका काळ जाऊनही तू त्यातून बाहेर यायलाच तयार नाहीयेस. मग आता निघतो मी. कारण असे ‘चौकटी’तले संवाद मला मान्य नव्हते कधीच. त्यामुळे आता थंबवण्याचा प्रयत्नही नकोत. तू तुला जमेल तशी चौकट मोडून बाहेर ये.. मग बघू.
आता मला नाही येता येणार तुझ्याकडे परत. कारण, या परतीच्या वाटेवर माझा ‘अहम’ दबा धरून बसला आहे.
तुझ्याकडे येतानाही मला तो जाणवला होता. पण, त्यावर तेव्हा मात करूनच मी इथवर आलो होतो. यापुढे ते शक्य नाही. त्याला मारुन टाकणं आता केवळ तुझ्या हातात आहे.
आता तू ये फक्त. मी तर कधीचा चौकटीबाहेर आहे..
तेव्हाही असेन.
..............................
पुस्तकातून."