Saturday, November 9, 2013

प्रतल

चुकलो आहे की चुकतो आहे माहीत नाही.. पण घुसमट होते आहे. म्हणून तुझ्याकडे आलो.. पण वेळ चुकीची होती बहुधा.
पण नाही.. तिथेही मला माझे गाणे म्हणायचे नव्हतेच. त्यात तुझा दोष नाही.. खरच.
मला शान्तता हवी होती तुझ्यासोबत. सैल व्हायचे होते. असो...
हवे तसे झाले नाही की भावनांचा पराजय होतो. त्याचा क्लेश अधिक बोचतो मनाला.
जाऊ दे..सोड विषय.
माझी काही तक्रार नाही. उलट फार मागे लागले की बाब निसटते हातून. जशी तू जाते आहेस क्षणाक्षणांनी.. मग वाटते सोडून द्यावे जे काही अदृश्य अपेक्षांचे पाश आहेत ते.
बघू किती आणि काय उरते..
गैरसमज नको करू.
होइल निचरा..  भावना नेस्तनाबूत झाली की मन कोरे होते.
मला समजतेय.. तुझे मनही बावरले आहे. पण मनातले काही बोलण्यासाठी दोघांची मने एका प्रतलात दिसायला हवीत.
ती आहेत, असे जाणवले की खरेच बोलेन.
......................................पुस्तकातून.

समज

बरोबर.. 
आता मला किमान काही वाटते आहे.
सध्या कमालीच्या अस्वस्थपणात अडकलो आहे.. आता घालमेल, कुतूहल, संदिग्धता, दाम्भिकता, उणीवा असे सगळे पुरते एकवटले आहे..
पहा मला तुझे शेकडो चेहरे दिसताहेत. 
भावनेचे थैमान असुनही पुरते कोरडे पडलेले.. 
मला एकाकी, एकटे वाटू लागले आहे एव्हाना.
आता मात्र मला पुरेसे सूक्ष्म व्हायला हवे. नाविन्याचा मार्ग गर्भातून जातो म्हणतात सुक्ष्माच्या. पण मला गर्भ नाही. 
तो मी तुला कधीच देऊ केला आहे.
तू मला तो परत देशील!!? की...
अरेरे.. तुला ओळखणे बनणार आणखी अवघड.

खेटून उठलेल्या या अस्वस्थ मनोऱ्याने हां माणूस समजणे मुश्किल बनवले आहे.
म्हणून कदाचित मला मी समजत नसेंन.
.................. पुस्तकातून