Sunday, February 24, 2013

निरोप येतात..
फोन होतात..
बोलणी होतात.
गप्पा होतात..
चर्चा होतात..
वाद होतात..
मग...
भेट ठरते.
 कारण ठरतं.
 दिवस ठरतो.
वेळ ठरते.
ठिकाण ठरतं.
पुन्हा निरोप येतात..
काम येतं.
अडचण येते.
वेळ होतो.
भेट फसते.
पुन्हा निरोप येतात.
फोन होतात..
पण, भेट फसवत जाते आपल्याला.
एरवी भेटीतून नाती दृढ होतात असा माझा अनुभव.
तुझा काय असेल तो.. माहीत नाही.
पण, ‘भेट’ हा शेवट असेल का आपला?
म्हणूनच ‘ती वेळ’ येत नसावी.
भेटीनंतर येणाऱ्या पूर्णविरामापेक्षा सतत अधेमधे येणारे हे अल्पविराम, स्वल्पविराम, अर्धविराम बरे.
कारण, इप्सित गाठल्यानंतर येणारं भांबावलेपण गोठवून टाकणारं असतं, हे मी बऱ्याचदा अनुभवलंय.
हे काठिण्य मोडायचं असेल तर डोळ्यासमोर नवं साध्य असावं लागतं.
तुझ्या-माझ्या भेटीनंतर माझ्यासमोर काय इ्प्सित असेल ते नाही माहित मला.
समजा काही आलंच डोळ्यासमोर.. तर तुला ते मान्य असेल का?

......................................................... पुस्तकातून.