Thursday, June 13, 2013

काय लिहू?
कसं लिहू?
काय होईल लिहिल्यामुळे?
शब्द सांडत जातील एकामागोमाग एक
या पहुडलेल्या पांढऱ्या माळरानावर काळी गोलाई डोलेल.
बदल झाला तर फक्त एवढाच.
बरं, येवढं करून जे म्हणायचंय ते नेमकं उमटेल याची शाश्वती नाही.
समजा, जे जे हवं ते ते लिहिलं जरी,
तरी ते वाचणाऱ्याच्या डोळ्यात उतरेल याची खात्री नाही.
मग कशाला लिहायचं?
आणि काय लिहायचं?
साऱ्या खटाटोपानंतर समाधानाचा शोध संपत नाहीच.
केवळ आणि केवळ ‘ह्याला काही म्हणायचंय बहुतेक’ येवढचं लक्षात येतं समोरच्याच्या.
या शोधातला मैलाचा दगड दृष्टीस पडतो तो हा एवढाच.
................................................................................. पुस्तकातून.