Friday, November 30, 2012

व्यक्त व्हायला भाषेची गरज नाही हे मलाही माहितीये.
तसं तुझं व्यक्त होणंही माझ्या डोळ्यांतून सुटलेलं नाही. पण, भावनांची तीव्रता नेमकेपणाने समोरच्याला कळावी म्हणून कधीमधी भाषेचा घेतलाच आधार तर बिघडतं काय?
आवर्जून सांगाव्या लागल्या चार गोष्टी तर त्यात कमीपणा नव्हे.
हे बघ, भावना ही पाण्यासारखी असते. अथांग.. तिचा तळ शोधणंच तसं कठीण आणि मूर्खपणाचं. आणि भाषा ही त्यावरच्या तरंगांसारखी.
तरंग नाहीत म्हणून पाण्याचं अस्तित्त्व शून्य होत नाही, हे खरंच. पण, त्यावर उठलेच तरंग तर त्याचं अस्तित्त्व अधिक गहिरं, जिवंत आणि नितळ होतं.
तुला नाही वाटत असं?
खरं सांग..
..................................... पुस्तकातून.

No comments:

Post a Comment