Monday, December 10, 2012

दृष्टी बंद करता आली पाहिजे काही काळापुरती..
बुद्धीचे, मेंदूचे, डोक्याचे सगळे दरवाजे आता घट्ट ओढून घ्यायला हवेत.
असा पुरता अंधार दाटून यावा चहूबाजूंनी.
आता भिरभिरतं मन नुसतं फिरत राहिलं पाहिजे वेगाने, उरलेल्या शारीरिक अंतराळात.

साचलेल्या विचारांच्या.. जून झालेल्या सवयींच्या.. उष्ट्या आठवणींच्या भूलभूलय्या भिंतींना  धडका मारणं सुरू व्हावं काही काळाने.
त्याला पर्याय नाहीच.
..
..
डोक्यापलिकडे आणि दृष्टीत न येणाऱ्या बाहेरच्या नव्या दुनियेत जायचं असेल..
तर साला, एक तरी भिंत पाडली पाहिजे.
.................................................................................... पुस्तकातून.